शील
”सुत्तपिटकाच्या मज्झिम निकायातील आकंक्खेय्य सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात – ज्याला समाधी भावनेचा परिपूर्ण, सहज आणि मनाला वाटेल तेव्हा लाभ घ्यावासा वाटत असेल, तर त्याने सर्व प्रथम उत्तम रितीने शीलाचे पालन करावयास पाहिजे.” कारण शीलाशिवाय तर समाधी भावनाच होऊ शकत नाही. अर्थात आरोग्य लाभm वाणीची मधुरता आणि मनाचा निश्चय व निर्मळता हे सर्व लाभ तर शिलांच्या पालनानेच लाभतात. म्हणजेच काया, वाचा आणि मनाची जागरूकता, मानसिकता, संयम मग तो चर्यामय, स्मृतीमय, ज्ञानमय, शांतीमय आणि उद्योगमय असू शकतो, आणि अनुलंघता हे सगळे सूक्त म्हणजे क्रिया अथवा उपाय मानवी जीवन दुक्खमुक्त व्हावे म्हणून सौख्य लाभ व आनंदी जीवन जगता यावे; म्हणून केलेले उपाय समजले पाहिजेत. पण हे सगळे दुसऱ्याला मारून, त्रास देऊन, लूटखसोट करून, दादागिरी, गुंडागर्दी करून अर्थात मानवता गहाण ठेऊन प्राप्त होत नाहीत. अहंकार आणि उर्मठपणाने होत नाहीत. त्यासाठी समता, समानता, बंधुता, मैत्री, करुणा आणि सहकार या क्रियांचे वळण लाऊनच आपन प्राप्त करु शकतो. म्हणजेच सम्यक प्रयत्नानेच साध्य होऊ शकते. सम्यक प्रयोजनाचे दूसरे नाव आहे शील.
Specifications
- book-authors
- भदन्त तिस्सवंस महास्थविर
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.